‘निवेंडी, धामणसे एमआयडीसी’साठी अधिसूचना जारी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

उद्योगधंदे उभारण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतीच्या सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.

Must read

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी संपादित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१च्या कलम ३२ (२) अन्वये उपविभागीय अधिकारी (रत्नागिरी) यांनी आज ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसू‌चनेनुसार, निवडी गावातील सुमारे १.९२ हेक्टर आणि धामणये गावातील २.७९ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी निश्वित करण्यात आली आहे. यामध्ये निवेडीतील सर्वे नं. ३६, ३०,४३,४५, ४५ आणि धामणसेमधील सर्वे नं. १०५, १६९ मधील ठराविक हिस्ल्यांचा समावेश आहे. या जमिनींचा वापर भविष्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतीच्या सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.

ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित जमिनीच्या विक्रीवर, हस्तांतरणावर किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या काळात कोणीही जमिनीचा व्यवहार केला किंवा त्याकर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही तसेच, भूसंपादन कायद्यानुसार (२०१३) या जमिनींचा ताबा घेताना योग्य नुकसानभरपाई देण्याची तरतूदही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आक्षेप नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत – ज्या जमीनमालकांना किंवा या जमिनीशी संबंधित इतर व्यक्तींना या निर्णयावर काहीही आक्षेप घ्यायचा असेल त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी आपले लेखी म्हणणे पुराव्यांसह रत्नागिरी बेधील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्यांना प्रत्यक्ष सुनावणी हवी आहे, त्यांना सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आपले म्हणणे मांडता येणार आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article