अरबी समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत मोठा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या रहस्यमयी घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मच्छिमारांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छिम ारांना या क्षेत्रापासून दूर राहण्याचा कडक इशारा दिला आहे. तज्ञांची एक विशेष टीम आता या रहस्यमय उकळत्या सम द्राची चौकशी करत आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही ममच्छिमारांनी पाण्यातून निघणारे भयानक बुडबुडे आणि पाण्याच्या मध्यभागी येणाऱ्या जोरदार लाटांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये समुद्राचे पाणी चुलीवरील भांड्यात असलेल्या पाण्यासारखे उकळत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील पालघर ते गुजरात पर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाचूबंदर रहिवासातीला मारली खंड्याला मच्छिमार किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या ओम नमः शिवाय या त्याच्या बोटीवर खोल समुद्रात मासेमारी करत होता.
मच्छिम ारांना समुद्राचे पाणी गढूळ आणि वेगाने एका मोठ्या वर्तुळात फिरत असल्याचे दिसून आले. असे दिसून आले की पाणी उकळत आहे, पाण्यातून मोठे बुडबुडे बाहेर पडत आहेत, धूर बाहेर पडत आहे आणि पाण्यात तीव्र गोंधळ आहे. गुजरात किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्यात एक गूढ उकळत्या संवेदना चिंतेचा विषय बनली आहे. मच्छिम ारांनी पाण्यात भयानक बुडबुडे आणि जोरदार लाटा उसळतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. अरबी समुद्रातील या रहस्यमयी बुडबुड्यांबाबत बोलताना पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी म्हटले की, ‘ही घटना अत्यंत गंभीर आणि असामान्य आहे.” मच्छिमारांनी पाठवलेल्या व्हिडिओंमध्ये पाण्याचा एक मोठा भाग सतत उकळत असल्याचे दिसून येत आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर अशी घटना सामान्यतः कधीच पहायला मिळत नाही. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, ही सामान्य समुद्राची लाट नाही. खोल समुद्रातील एक मोठी प्रक्रिया यासाठी जबाबदार असू शकते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सागरी आणि औद्योगिक संस्थांना तात्काळ बोलावण्यात आले आहे. अधिकारी आता पाण्याचे नमुने आणि आजूबाजूच्या डेटाचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
