हायपरटेन्शनसाठी फक्त मीठ कमी करणे पुरेसे नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी केवळ मीठ सोडण्याऐवजी 'या' गोष्टींकडे द्या लक्ष.

Must read

आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘हायपरटेन्शन’ म्हणजेच उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या बनली आहे. जेव्हा जेव्हा रक्तदाब वाढतो, तेव्हा आपल्याला पहिला सल्ला मिळतो तो म्हणजे “जेवणातील मीठ कमी करा.” पण तुम्हाला माहित आहे का? केवळ मीठ कमी केल्याने रक्तदाबाची समस्या पूर्णपणे सुटत नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनात तज्ज्ञांनी यामागची धक्कादायक कारणे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.

भारतीयांच्या जेवणात मिठाचे प्रमाण नेमके किती? जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमानुसार, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणे अपेक्षित आहे. मात्र, भारतीय लोकांच्या आहारात हे प्रमाण सरासरी ८ ग्रॅम किंवा त्याहून अधिक आहे. आपण लहानपणापासूनच जास्त मीठ असलेल्या चविष्ट पदार्थांची सवय करून घेतल्यामुळे ही समस्या अधिक जटील बनली आहे.

केवळ ‘मीठ कमी करा’ हा सल्ला का अपयशी ठरतो? डॉ. एराम राव आणि डॉ. जमुना प्रकाश यांच्या मते, यामागे काही प्रमुख कारणे आहेत: १. घरगुती जेवण: पाश्चात्य देशांमध्ये पॅकेज्ड फूडमुळे मीठ जास्त खाल्ले जाते, पण भारतात ८०% मिठाचे सेवन हे घरात बनवलेल्या स्वयंपाकातून होते. अशा वेळी घरच्या चवीशी तडजोड करणे अनेकांना कठीण जाते. २. अज्ञानाचा अभाव: एका सर्वेक्षणानुसार, केवळ ३३% लोकांना हे माहित आहे की जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याला धोका पोहचतो. माहिती नसल्यामुळे लोक या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. ३. चवीशी तडजोड: मीठ कमी केल्यावर अन्न बेचव लागते. त्यामुळे लोक पुन्हा वरून मीठ घेतात, ज्यामुळे मूळ उद्देशच सफल होत नाही.

उपाय काय? तज्ज्ञ सांगतात ‘हा’ पर्याय: केवळ मीठ टाळण्याऐवजी चव टिकवून सोडियमचे प्रमाण कसे कमी करता येईल, यावर भर दिला पाहिजे.

  • हळूहळू बदल: एकदम मीठ कमी न करता त्याचे प्रमाण हळूहळू कमी करावे, जेणेकरून जिभेला त्याची सवय होईल.

  • पर्यायी चव: चव वाढवण्यासाठी नैसर्गिक मसाले, लिंबू किंवा चिंचेचा वापर वाढवावा.

  • MSG चा वापर: संशोधनानुसार, सामान्य मिठात ३९% सोडियम असते, तर MSG मध्ये केवळ १२% असते. योग्य प्रमाणात MSG वापरल्यास पदार्थाची चव टिकून राहते आणि सोडियमचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी करता येते. सीएफटीआरआयच्या संशोधनात असे दिसून आले की बिर्याणी, सांबार आणि स्नॅक्समध्ये मिठाचे मिश्रण बदलल्यास चव न बदलता रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article