HomeRatnagiriसात किनाऱ्यांवर ७२० अंडी संरक्षित…

सात किनाऱ्यांवर ७२० अंडी संरक्षित…

मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवं आली.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झालेले आहे. त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत. मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवं आली. नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची गरज जाणवल्यानंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षामार्फत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव संवर्धनाला मोठ्याप्रमाणात सुरुवात झाली आहे. या कासवांच्या अंड्यांची पूर्वी तस्करी केली जात होती. काही ठिकाणी अंडी खाद्य म्हणून वन्यप्राणी वापरत होते. यासाठी त्या-त्या समुद्र किनारी असलेल्या गावातील लोकांचे प्रबोधन करून कासव संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांत ३४ किनाऱ्यांवर कासवांचे संवर्धन केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील पहिले घरटे गुहागर किनाऱ्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदले गेले. तेथील कासवमित्रांनी ती अंडी संरक्षित केली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ किनाऱ्यांवर कासवे अंडी घालून गेली आहेत.

मात्र, हे प्रमाण यंदा कमी असल्याचा अंदाज कासव अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर्षी पाऊस ऑक्टोबरमध्येही सुरू होता. त्यामुळे समुद्रही खवळलेला होता. अनेकवेळा पाण्याच्या प्रवाहांवर कासवांचे समुद्र किनारी येणे अवलंबून असते. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे कासवांचा कालावधी पुढे सरकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवरील कासवांच्या विणीचा हंगाम हा नोव्हेंबर, डिसेंबर होता. कालांतराने वातावरणातील बदल आणि अन्य कारणांमुळे तो पुढे गेला. गेल्या काही वर्षांत डिसेंबरमध्ये विणीच्या हंगामाची सुरुवात होत असली तरीही, प्रत्यक्षात मोठ्याप्रमाणात अंडी घालण्यासाठी कासवे येण्याचे प्रमाण जानेवारीच्या पुढेच आहे. त्यामुळे अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीही लांबला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments