सुषमा अंधारेंचा आदिती तटकरेंना टोला; महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजीनाम्याची मागणी!

"झेपत नसेल तर बाजूला व्हा"; पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून ठाकरे गटाची आक्रमक भूमिका.

Must read

पुणे: महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेषतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. “जर काम झेपत नसेल, तर पदाचा राजीनामा द्या,” असा थेट सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

नेमके प्रकरण काय? गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, सरकार याकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. “राज्यात महिला आणि बालविकास मंत्री नेमके काय करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘वडील पक्षाचे बादशाह आहेत म्हणून पद मिळाले का?’ आदिती तटकरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अंधारे म्हणाल्या, “आदिती तटकरे यांनी मंत्री म्हणून आतापर्यंत कोणते ठोस काम केले आहे, हे त्यांनी जाहीर करावे. आमचा त्यांना वैयक्तिक विरोध नाही, पण ज्या खुर्चीवर त्या बसल्या आहेत, त्या पदाला न्याय मिळणे आवश्यक आहे. केवळ वडील (सुनील तटकरे) पक्षाचे बादशाह आहेत म्हणून काम करणार का?” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न: पुण्यातील वाढत्या ‘पेईंग गेस्ट’ (PG) संस्कृतीवर आणि पाळणाघरांच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केले. लहान मुलांना पाळणाघरात ठेवले जाते, पण या पाळणाघरांचे कधी सर्वेक्षण झाले आहे का? तेथे मुलांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article